गुरुवार, १४ जुलै, २०११

वेदना

वेदना त्या धुरातच विरल्या
बॉम्बस्फोटांच्या खपल्या अजूनही ओल्या

गमावले प्राण ती जनता निष्पापी
राजकारणी सारेच हे पापी

सूर्याबरोबर हल्ली बॉम्बही उगावतो
अस्ताला जाताना कित्येक प्राणही नेतो'

मुंबईकर  नाईलाजास्तव बाहेर पडतो
स्फोटानंतर आपण त्याला "मुंबईची स्पिरीट" म्हणतो

देशात केला जातो हाय अलर्ट जारी
म्हणजे राजकारण्यांची सुरक्षा भारी

पैसे दिले तरी गेलेलं माणूस परत येत का?
कृतीविना आश्वासनं पूर्ण होऊ शकतात का?


खरच इतकं महाग झाला आहे का हे जगणं?
गरज आहे सरकारनं वेळीच धडा शिकणं!!!!!

1 टिप्पणी: